Posts

Showing posts from 2023

लाईटहाऊस तर्फे कल्याण डोंबिवलीतील सामाजिक संस्थांचा मेळावा संपन्न

Image
डोंबिवली:- कल्याण डोंबिवली महानगरपालिका व लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आयोजित "सामाजिक संस्थांचा मेळावा" दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी डोंबिवली लाईटहाऊस या ठिकाणी पार पडला.    या मेळाव्यामध्ये कल्याण डोंबिवली प्रभागातील ३७ सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शवला असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. चंद्रकांत जगताप, सहाय्यक आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका (फ वॉर्ड) व डॉ.अरुण पाटील एम. एस. संजीवनी हॉस्पिटल, मा. जयश्री कर्वे, डोंबिवली महिला महासंघ हे होते.  सर्व सामाजिक संस्थांनी "युवक व युवकांच्या बदलत्या करिअर विषयी अपेक्षा" यावर चर्चा करण्यात केली. या सर्व सामाजिक संस्था विविध विषयावर जसे रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण अशा विविध विषयांवर कल्याण डोंबिवली विभागात काम करत आहेत.  सर्व सामाजिक संस्थांनी आपापल्या कामाबद्दल इतर सामाजिक संस्थांना माहिती दिली जेणेकरून ह्या सर्व संस्था एकत्रितपणे समाज विकासाचे काम करू शकतात.  कार्यक्रमादरम्यान झोपडपट्ट्यांमधील युवकांसाठी सामाजिक संस्थेने कसे एकत्र येऊन काम करावे याबद्दल मार्गदर्शन मा. श्

सारथी शिष्यवृत्तीचा लाभ घ्या !

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा लागेल? या विषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे कडून मागविण्यात येतात. SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील इयत्ता नववी ते अकरावी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमहा 800 रुपये प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता ९ वी, १० वी व

*चला तर...मृत्यूनंतरही माणुसकी जिवंत ठेवूया... अवयवदान करूया!*

    भारतीय संस्कृतीत "दान" या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यापैकी रक्तदान, नेत्रदान याविषयी समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी "अवयवदान" हा सुध्दा राष्ट्रीय उपक्रम देशात राबविण्यात येतो. आजपावेतो वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रात भरपूर संशोधन करून नवनवीन शोध लावले आहेत आणि अजूनही काही शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत.       सन १९५४ साली पहिल्यांदा "अवयवदान" करण्यात आले. त्यावेळी रोनाल्ड ली हेरिकने किडनी दान करून स्वतःच्या भावाला नवजीवन दिले. त्याचवेळी डॉ.जोसेफ मरे यांनीही पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण केले. या मानवतावादी कार्यासाठी डॉ. जोसेफ मरे यांना 1990 साली शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.    दरवर्षी दि.१३ ऑगस्ट रोजी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, लोकांमधील भिती दूर होण्यासाठी "जागतिक अवयवदान दिवस" जगभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. तसेच हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव गरजू व्यक्तीला दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. मूत

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू...

            केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. 14 जुलै 2022 च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. 19 मे 2023 च्या पत्रानुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे.             प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरित्या भरपाई मिळावी, जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ दोन टप्प्यात रु. 5 पाच हजार देण्यात येईल. जर दुसरे अपत्य मुलगी झाले तर मुलीविषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात रु. 6 हजार लाभ देण्यात येणार आहे.             गर्भवती व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी या योजनेंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यात रु.5 हजार तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात रु.6 हजार लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्य

मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक योजना

            कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी..!” हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या लेखातून...                 सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच अनुसूचित जाती व अनुसचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्या

🚩शिकागो येथिल सर्व धर्म परिषदेस प्रा नामदेवराव जाधव यांना निमंत्रण🙏

Image
संभाजीनगर :- जगातील सर्वोच्च व्यासपीठ समजली जाणारी सर्व धर्म परिषद या वर्षी दिनांक 14ऑगस्ट ते 18ऑगस्ट या कालावधीत शिकागो अमेरिका येथे संपन्न होत आहे. या सर्व धर्म परिषद साठी हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधत्व करण्यासाठीचे निमंत्रण नुकतेच प्रा. नामदेवराव जाधव ज्येष्ठ इतिहासकार प्रसिद्ध लेखक आणि जागतिक कीर्तीचे वक्ते यांना मिळाले आहे.           आपणा सर्वांना कल्पना आहेच की या पूर्वी जेव्हा शिकागो येथे 1893 साली जी सर्व धर्म परिषद झाली होती तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म आणि भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता तब्बल 130वर्षानंतर हा बहुमान पुन्हा भारताला मिळाला असून  हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसधी प्रा. नामदेवराव जाधव सर यांना मिळाली आहे. या कार्यक्रमासाठी चे तसे अधिकृत निमंत्रण त्यांना मिळाले असून शिकागो येथील सर्व धर्म परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. प्रा नामदेवराव जाधव शिकागो येथे हिंदू धर्म आणि मानवाधिकार या आजच्या ज्वलंत प्रश्नावर बोलणार असून हिंदू धर्म कसा जगातील सर्वात प्राचीन आणि महान आहे आणि तो मानवाधिकार या स

मराठा तरुणांना 'सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम

         मुंबई - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.  जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.           '  सारथी  '  च्या लक्षीत गटातील मराठा ,  कुणबी ,  मराठा-कुणबी व कुणबी मराठा या प्रवर्गाच्या एकूण २० , ००० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणअंती रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.             कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी  https://kaushalya.mahaswayam. gov.in/users/sarthi   या लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी.             या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्याम

ती’लाही हवीय समान वागणूक...

Image
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या बाबत विचार करण्यासाठी नुकतीच मुंबईत एक परिषद झाली. या परिषदेत या महिलांच्या समस्याबाबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेचा आढावा घेणारा लेख...  “पतीच्या निधनानंतर दिराने एक लाखाला विकले….मुले पदरात आहेत. वय वाढल्याने आता अर्थार्जनही कमी आहे…म्हातारपणी कसे जगावे कुणाचाच आधार नाही…” ही वेदनादायक कथा ती महिला हूंदके देत सांगत होती.  एकीने “सरकारी रूग्णालयातही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ओळखपत्र आणा असे सांगतात…” असे सांगितले. तर, “….बच्चो को पढाना है लेकीन आधार कार्ड लेके आओ…पिता का नाम क्या है..?” असे विचारत असल्याचे तीची सखी सांगत होती. बाजूच्या महिला त्यांना आधार देत होत्या. देह विक्री व्यवसायात असलेल्या या महिलाचं एकमेकींचा आधार असतात.  मुलांचे ओळखपत्र तयार करताना आईचे नाव लिहू शकतो... याबद्दल त्यांनाच काय, अनेक संस्थांमधील नोकरवर्गाला माहित नसल्याने त्यांच्याकडून वडीलांचे नाव, दाखला अशी कागदपत्रे मागवली जातात. ती सादर न केल्यास त्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही. पुरूष प्रधान संस्कृती बदलत असली तरीही, आई सुद्धा मुलांच्या आयुष्य

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन   ठाणे :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था/लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने भारत निवडणूक आयोगाव्दारे दि. ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सर्व घटकातील पात्र मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.               ठाणे जिल्ह्यात ३ लोकसभा मतदारसंघ व १८ विधानसभा मतदार संघ असून दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार ठाणे जिल्ह्यात ६२,१४,५१७ इतके एकूण मतदार असून यामध्ये ३३,६७,१२० पुरुष मतदार आणि २८,४६,३१९ महिला मतदार आणि १०७८ तृतीयपंथीय मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ६३९१ मतदान केंद्रे असून ५४०२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. दिनांक ०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

Image
लाखो वारकऱ्यांना मिळणार लाभ             मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.              यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.             वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उ

तलाठी पदभरतीसाठी मदत कक्ष

ठाणे ,  :   ठाणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या   अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन कर ण्यासाठी   मदतकक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात   आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कळविली   आहे.              महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरती च्या   अनुषंगाने तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासन स्तरावर जा हि रात प्रसि द्धीस   देण्यात येणार आहे. तसेच तलाठी पदभरती अर्ज करणा ऱ्या   उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन कर ण्यासाठी   विभाग व जिल्हास्तरावर मदत कक्ष ( हेल्प   डेस्क) स्थापन करण्या च्या सूचना देण्यात आल्या आहेत.    त्या अनुषंगाने   ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे   तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा ऱ्या   उमेदवा रांच्या मदतीसाठी   मदतकक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.   या मदतकक्षात तहसीलदार   रेवण लेंभे   ( भ्रमणध्वनी क्रमांक 9766599651 )   व अव्वल कारकून महेंद्र खोडके   ( भ्रमणध्वनी क्रम

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Image
रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा               मुंबई ,  दि. 2 :  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे,  अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.             छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.             उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ,  पालकमंत्री उदय सामंत ,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पा

कल्याण लोकसभेचा राजकीय, सामाजिक प्रवास

*वास्तव*  :-  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या  कल्याण   लोकसभा  क्षेत्रात झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत आणि नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडून ठाणे,  कल्याण  डोंबिवली, उल्हासनगर सारख्या महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद  यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. स्मार्ट शहराचं समस्यांचे शहर अशी ओळख निर्माण झालेली आहे. डोंबिवली आणि अंबरनाथ  या दोन्ही एमआयडीसी नागरी वस्तीत निर्माण झाल्या का ? असा प्रश्न उपस्थित होतो. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारती, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यांनी नागरिकांची पाठ सोडलेली नाही. अनधिकृत बांधकामे हे  कल्याण  डोंबिवली महापालिकेसमोरील सर्वात मोठे संकट आहे.  कल्याण  मध्ये मेट्रो येऊ घातली असली तरी  कल्याण  आरटीओ मीटरवर रिक्षा चालवायला असमर्थ ठरत आहे असेच म्हणावे लागेल. अमृत योजनेकडे येथील नागरिक डोळे लावून बसले असून पाणी टंचाई हाही येथील कळीचा मुद्दा आहे. वाढीव घरपट्टी हा प्रत्येक महानगरपालिकेत सध्या वादाचा विषय बनत चालला आहे तो इथेही आहे. दिवा, कल्याण , उल्हासनगर आणि अंबरनाथ  डम्पिंग ग्राउंडवर ठोस उत्तर तेथील स्थानिक स्

दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी

                    दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. महाराष्ट्रात दिव्यांगांची संख्या तीन लाखाहून अधिक आहे.  राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के दिव्यांग आहेत. दिव्यांगांची संख्या कमी करण्यासाठी देशभरामध्ये विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. शासन सेवेत तसेच खाजगी क्षेत्रात दिव्यांगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिव्यांगांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना समान संधी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग यासाठी अधिनियम 1995 मध्ये कलम 60 अन्वसये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या  सामाजिक न्याय विभागात करण्यात आली आहे. आतापर्यंत या सर्व योजनांसाठी दिव्यांग व्यक्तींना त्या- त्या कार्यालयात जावे लागत होते. त्यांचा येण्या-जाण्याचा त्रास कमी व्हावा, तसेच त्यांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घर बसल्या मिळावा, यासाठी शासनाने "शासन आपल्या दारी" या महत्त्वकांशी उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या दरात उपलब्ध करून दिल

संत रोहिदास महामंडळाच्या योजनांसाठी कागदपत्रे जमा करा

संत रोहिदास महामंडळाच्या योजनांसाठी कागदपत्रे जमा करा ठाणे ,  दि. १९  -   राज्य शासनाने  ‘ शासन आपल्या दारी ’  हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येत असून महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी कर्ज योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे सादर करावीत ,  असे आवाहन महामंडळाने केले आहे.          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार ,  मोची ,  ढोर व होलार इ.) नागरिकांचे जीवनमान उंचावणे ,  समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळविसाठी तसेच त्यांचे शैक्षणिक ,  आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावाचाही यामध्य

शामराव पेजे महामंडळाच्या योजनांचा घ्या लाभ

              शासकीय योजनांची माहिती देणे, त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासन आता थेट नागरिकांच्या दारी जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठीच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकण तर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे.             राज्यात सुशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे. व्यक्ति, कुटुंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने महामंडळाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीपर्यंत राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन सक्षम होता येईल. महामंडळाच्या योजना खालील प्रमाणे. 20% बीज भांडवल योजना :-              ही योजना राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येते. महामंडळाचा स

सारथी कार्यालय खारघर नवीमुंबईत सुरु

Image
             नवी मुंबई ,  दि .12: महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून संस्थेचे मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्हयांचे कार्यक्षेत्र आहे. मुंबई विभागीय कार्यालय एमटीएनएल इमारत, रेनट्री मार्ग, सेक्टर-21,खारघर ता.पनवेल जि.रायगड येथे सुरु करण्यात आले आहे.             तरी कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजबांधवांनी मुंबई विभागीय कार्यालयात भेट द्यावी व सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावा असे आवाहन सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

Image
*पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी* *समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली*  *- केंद्रीय मंत्री अमित शहा* नवी मुंबई, दि. 16 (विमाका) - वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले  राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी श्री. शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सा