Posts

Showing posts from May, 2022

शुद्ध हवेचे ध्येय गाठणे ही सामूहिक जबाबदारी : आ. प्रशांत ठाकूर

Image
  पनवेलच्या शुद्ध हवेसाठी स्थानिक नागरिक व सर्व पक्ष एकवटले ! पनवेल: शुद्ध हवेचे धेय्य गाठणे हि  स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांची सामुहिक जबाबदारी आहे. वायू प्रदूषण हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. भावी पिढ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी स्वच्छ हवा गरजेची आहे.  पनवेलमधील वाढत्या वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी सामुहिकरीत्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतेच मांडले.  हवेची गुणवत्ता सुधारणे हि केवळ प्रशासनाची किंवा कोण्या एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या व्यक्तीची जबाबदारी नसून त्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले. क्लीन एअर फॉर पनवेल या परिसंवादात ते बोलत होते. पनवेल परीसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे पनवेलकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल आणि लगतच्या परिसरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यावतीने धोरणात्मक उपायांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवार

सत्यमेव जयते चा बामणे येथे शेतकरी मेळावा

Image
कोल्हापूर:  सत्यमेव जयते फाऊंडेशन ने विठ्ठल रखुमाई मंदिर बामणे ता. भुदरगड येथे भव्य शेतकरी मेळावा सोमवार दि.16 मे 2022 रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सत्यमेव जयते फाऊंडेशन अंतर्गत निवृत्त मेजर तुकाराम परसू खवरे यांनी पामोसा ऍग्री सायन्स कंपनी पूणे येथील डायमंड कृषी तज्ञ सोलापूरे , चंद्रकांत लष्करे व सुरेश सावंत यांना बोलावले होते. कृषी तज्ञ सोलापूरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेती कशी करावी, कोणती बी बियाणे वापरावीत, तणनाशक औषधे कोणती व कशी वापरावीत , माती परीक्षण, रासायनिक खतांचे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती दिली. बहुसंख्य लोकांनी आपल्या शंका विचारून शंका निरसन करून घेतले. या संपूर्ण शेतकरी मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी निवृत्त मेजर तुकाराम परसु खवरे, त्यांचा मुलगा जय खवरे, फाऊंडेशन चे अध्यक्ष संदीप मेंगाणे यांनी पार पाडली. किरण खवरे सरांनी आलेल्या तज्ञांचे आणि पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मानले. कार्यक्रम झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्याला उपयुक्त माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले व पाहुण्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व शेतकरी, प्रतिष्ठित

उद्या कोल्हापूर होणार स्तब्ध !

६ मे १९२२ या दिवशी राजश्री शाहू महाराजांचे निधन झाले त्या दिनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.आणि या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. येत्या ६ मे रोजी सकाळी ठीक १० वाजता सारे कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध होणार आहे. ही स्तब्धता म्हणजे, राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार १०० सेकंद थांबून रस्त्यावर जिथे आहे तिथे दीड मिनिटे थांबून हे स्तब्धता रुपी वंदन प्रथमच साकारले जाणार आहे. या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील, परदेशातील ज्यांना शाहू महाराजांची थोरवी माहिती आहे ते कोणीही त्यांच्यासाठी स्तब्ध राहून सहभागी होऊ शकणार आहेत.  या निमित्ताने शाहू महाराजांनी आपल्यासाठी किती काय काय करून ठेवले आहे. त्याचे स्मरण केले जावे. त्यांच्या या कार्याची स्मृती प्रत्येकाच्या मनात रुजावी हा यामागचा उद्देश आहे. १ मे पासून स्तब्धते बाबत दररोज एफएम, रेडिओ, सर्ववृत्तवाहिन्या, चॅनलवरून सतत प्रसिद्धी दिली जाणार आहे. ६ मे सकाळी १० वाजता १०० सेकंदासाठी स्तब्

नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात मिळणार 15 लाखांची वर्कऑर्डर

नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन सहभागासाठी अर्ज करण्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन                        ·          विजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंत शासकीय कामाची वर्क ऑर्डर   मुंबई ,   : राज्य शासनाच्या कौशल्य ,  रोजगार ,  उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी   www.msins.in/ startup-week   या संकेतस्थळाला भेट द्यावी ,  असे आवाहन विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत दि. ३० मे २०२२ पर्यंत आहे.             स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून    प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अ