Posts

Showing posts from January, 2015

ध्वजोत्सव !

ध्वजोत्सव ! लिया हाथमे ध्वज कभी ना झुकेगा । कदम बढ रहा है कभी ना रुकेगा ।                  विजय रणांगणातील असो वा अन्य क्षेत्रातील; ध्वज हा पाहिजेच ! विजयाचे व विजयाकांक्षेचे प्रतिक असलेले ध्वज संघर्षमय मानवी जीवनात मान्यता पावलेले आहेत. विजयी, स्वतंत्र व ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रांना त्यांचा ध्वज वैभवशाली जीवनांचे रक्षण करण्यास व विकसनशील राष्ट्रांना ध्वज मागील पिढ्यांच्या रोमहर्षक पराक्रमांची व अतुलनीय स्वार्थत्यागाची आठवण करून देत असतो. अनेक राष्ट्रांच्या ध्वजाचा इतिहास रोमहर्षक आहे. ऑसट्रेलीयाच्या ध्वजाचा उदय युद्धातच झाला आहे. पुरातन ध्वज हे बहुतेक शुद्ध धार्मिकच होते असे अमेरिकेच्या ज्ञानकोशात निसंधीग्ध शब्दात सांगितले आहे. युद्धक्षेत्रात उतरण्यापूर्वी परमेश्वरी दैवी शक्तीचा वरदहस्त घेण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक ओढा असतो. अर्जुनाने आपल्या रथावरील मारुतीचे चिन्ह ध्यान करून आणून लावले असे वर्णन आढळते. इंग्लंडच्या पहिल्या एडवर्ड राजाने तर सेंट जॉनचे चित्र असलेला मंदिरावरील ध्वज एका मोहिमेत सैन्यासोबत आदरपूर्वक न्हेला होता. आणि त्यावेळी ध्वज घेवून आलेल्या पाद्र्याला दिवसाला साडे आठ

प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी "बिकट वाट"

Image
माझी विदर्भातील अमरावतीची मैत्रीण पूजा डकरे हिचा बिकट वाट हा कविता संग्रह परवाच वाचून काढला. तेथील बोके प्रिंटर्स प्रकाशनाने मागील वर्षी या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले होते. मराठी आणि हिंदी अश्या दोन भागात विभाजन केलेले हे छोटेखानी पुस्तक ६० रुपयात उपलब्ध करून देण्यामागे प्रोत्साहानाचाच मुख्य हेतू समोर दिसतो. तीमिरातुनी तेजाकडे हा या एकूण कवितांचा सूर दिसून येतो.वि. स. खांडेकर एकदा म्हणाले होते कि, "विशी पंचविशीतील बहुतेक तरुण तरुणी प्रेमवीर,देशभक्त आणि ध्येयवेडी असतात!" हि गोष्ट कवितेतून आदर्शवाद मांडणाऱ्या पूजाला तंतोतंत लागू पडते असे माझे मत बनले आहे ! देशप्रेम,स्वार्थत्याग, भ्रष्टाचाराला विरोध,शब्दमहती, युवक, गरिबांच्या वेदना हे नवख्या कवीच्या पहिल्या कविता संग्रहात येणारे विषय येथे पाहायला मिळतील. स्त्रीत्वाचा अभिमान ठेवून तुझा वर तूच निवड असा स्त्री सबलीकरणाचा विषयही पाहायला मिळतो.त्याचबरोबर स्त्रीविना जग अस्तित्वहीन होईल कारण चंद्रालासुद्धा चांदनिचाच आधार असतो असा स्त्रीचा माहीमापण पाहायला मिळतो. आजची शिक्षणप्रणाली कारखान्याचा कच्चा माल असून त्या कारखान्याचे मालक रा

आजरा तालुक्यातील उत्तूर पंचायत समिती गटातील विविध समस्यांबाबत माजी विध्यार्थी संघटनेचे निवेदन

Image
                                                                   लोकाभिमुख सरकार आणि गतिमान प्रशासनाकडून तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत. गावाकडील सुशिक्षित युवक मोठ्याप्रमाणावर शहरांकडे विस्थापित होत असल्याने गावे ओस पडत आहेत.विकासगंगा शहराकडून गावाकडे पाझरत येत असल्याने शहर आणि ग्रामीण अशा दोन भागात समाजाचे विभाजन होवून परावलंबत्व येताना दिसत आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेवून शहरात गेलेल्या विध्यार्थ्याला स्पर्धेत टिकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो; शिवाय केंद्रीय बोर्डाच्या शिक्षणाची वाढती मागणी राज्याच्या शिक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.ग्रामीण भागातील विध्यार्थी स्पर्धेत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि भावी सक्षम नागरिक बनण्यासाठी गेल्या ३ वर्षांपासून लक्ष्मी विद्यालय बेगवडे येथील माजी विध्यार्थ्यांची संघटना कार्यरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गाव विकास समिती या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेचा सरचिटणीस म्हणूनही मी काम पाहत आहे. उत्तूर पंचायत समिती गट हा कोल्हापूर जिल्ह्यातील विकसनशील भाग आहे. याभागातील सर्वच स्तरातील विकासाचा/बदलाचा  फायदा नव्या पिढीला होणार अ