Posts

Showing posts from December, 2021

आधी महागाई आणि बेरोजगारी या व्हायरसचा बंदोबस्त करा :- सुहास खंडागळे

*कठोर निर्बंध लादण्या आधी प्रचंड महागाई आणि बेरोजगारी हे दोन व्हायरस सामान्य लोकांच्या मानगुटीवर बसले आहेत याचा विचार सरकारने करावा- सुहास खंडागळे* यांना पुन्हा परदेशातून नव्या कोरोनाचे(ओमॅयक्रोन) संक्रमण वाढतंय हे माहीत होतं...मागच्या वेळी चुका केल्या त्यातून हे काहीच शिकले नाहीत.परदेश वाऱ्या करणाऱ्यांना कंट्रोल करण्या ऐवजी सामान्य माणसांवर वारंवार निर्बंध लावण्याची भूमिका सरकार घेणार असेल तर सरकारने आधी लोकांच्या रोजी रोटीची व्यवस्था करावी!कोणतेही कठोर नियम लादण्या आधी कोरोना प्रमाणेच महागाई आणि बेरोजगारी हे भयंकर व्हायरस लोकांना जेरीस आणतायत याचं भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावं...! बाकी नवीन व्हेरियन्ट बाबत नागरिक स्वतः काळजी घेत आहेत.लोक बेफिकीर आहेत असं जे बिंबवले जात आहे ते चूक आहे.दोन वर्षांच्या त्रासातून लोकं बरच काही शिकले आहेत...लोकं लोकांचं काम करत आहेत,सरकार आधी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे का?हे त्यांनी तपासून पहावं! कोरोनाचे नवे व्हेरियन्त हे परदेशातून आला असेल तर याला देशात प्रामाणिक पणे रांगा लावून दोन दोन डोस घेणारी जनता दोषी कशी? बाहेरून येणाऱ्या लोकांचे नियोजन तुम्हाल

उत्थान योग केंद्र बदलापूरमध्ये साउंड थेरपी

Image
ही थेरपी नाही चमत्कार आहे ! हे जग स्पंदनांचेच तर आहे याची प्रचिती आज खूप प्रभावीपणे मला आज झाली.  आपल्या पाच ज्ञानेंद्रियांव्यतिरिक्त सहावी जाणीव सुद्धा किती महत्वपूर्ण काम करते हे सुद्धा या थेरपीत समजते. निद्रानाश, अर्धशिशी किंवा पूर्णशिशी तसेच तनावमुक्तीसह एकाग्रता वाढविणे, मनाची शांतता अनुभवणे आणि ध्यानधारणासाठी तयारी करणे यासाठी मला वाटते साउंड थेरपी खूपच उपयोगी पडेल.       आचार्य विनोबा भावे म्हणत हिंदू  धर्म हा अनुभवण्याचा धर्म आहे तसे ही थेरपी अनुभवण्याचा विषय आहे. पंचधातूंचे भांडे खूपच प्रभावी व गुणकारी आहे. मी या थेरपीच्या प्रेमात पडलो असून किमान महिन्यातून एकदा हा अनुभव घेतल्यास शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम होतील असा माझा ठाम विश्वास बनलाय !  थेरपी दरम्यान मी शून्यात गेलो होतो व थेरपीच्या शेवटच्या टप्यात मला पुन्हा थेरपीच्या आवाजामुळेच जाग आली व शेवटी पंचधातुच्या भांड्याची  अफलातून कंपने अनुभवताना मी थक्कच झालो..  खरच हा गहन विषय आहे ! कोल्हापूरच्या भाषेत हार्ड विषय आहे ! नाद खुळा थेरपी ! पुन्हा पुन्हा यायलाच लागतंय.... ! शेवटी येथील योग

उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी पावले उचला- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Image
·        नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना    मुंबई, दि. 21 : उल्हास नदीच्या काठावरील मोहने आणि म्हारळ येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीत प्रदूषणमुक्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.             उल्हास नदीच्या काठावर मोहने आणि म्हारळ परिसरात अतिक्रमण आणि नदी पात्रात औद्योगिक आणि नागरी वसाहतीतील दूषित पाणी मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.             जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाने अतिक्रमण निश्चित करावी. अशा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी. ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने कार्यवाही करण्यात यावी. उल्हास नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा 25 डिसेंबरपर्यंत

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा 25 डिसेंबरपर्यंत           मुंबई ,  दि. 21 : कौशल्य विकास ,  रोजगार व  उद्योजकता आयुक्तालय यांचे मार्फत बेरोजगार उमेदवारांकरीता 12 ते 17 डिसेंबर ,  2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची मुदत आता 20 ते 25 डिसेंबर ,  2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे ,  अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.             मुंबई शहर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.             लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय/उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्बळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारपणे 10 वी ,  12 वी ,  आयटीआय ,  डिप्लोमा ,  पदवीधर तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेद

मराठेशाहीतील चिमाजी आप्पा यांची समुद्रदुर्गांवरील मोहीम

  🚩 चिमाजीआप्पा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र                             अभिवादन 🚩               चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथ भट यांचे सुपुत्र.चिमाजीआप्पांचे मुळ नाव अंताजी पण पुढे ते चिमाजीआप्पा या नावाने प्रसिद्ध झाले. चिमाजी अप्पा लहानपणापासूनच आपले भाऊ बाजीराव यांच्या बरोबर राहून राजकारणाचे ,युद्धकौशल्याचे धडे गिरवीत होते. वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी शाहू महाराजांनी बाजीराव यांच्यावर सोपवली होती. बाजीराव हे तापट, बेधडक स्वभावाचे होते, तर चिमाजी आप्पा शांत, धोरणी व दरबारी कामात कुशल होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली.                     थोरले बंधु बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव सावलीसारखे त्यांच्या पाठी राहिले. या जोडीला ‘राम-लक्ष्मण, सुद्धा म्हणले जाते, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते हेच खरे आणि तसेच च

कल्याणचा राज काळे एनडीएची परीक्षा पास

Image
भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, ता- कल्याणच्या कु राज प्रशांत काळे याचे एन . डी . ए . परिक्षेत मिळवले घवघवीत यश !  कल्याण - (बाबुराव खेडेकर) युपीएससी  द्वारे घेण्यात येणाऱ्या  एन . डी .ए . 'परिक्षा - २०२१ ' या   देशसेवेत- भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होणेसाठी घेण्यात येणाऱ्या  अत्यंत कठीण अशा लेखी-परीक्षेत कु. राज माधुरी- प्रशांत काळे याने  घवघवीत यश संपादन केले आहे. युपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या एन डी ए ची परिक्षा - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला, पुणे मार्फत देशसेवेत- भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होणेसाठी घेण्यात येतात .अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या लेखी-परीक्षेत कु. राज प्रशांत काळे याने हे यश संपादन केले आहे . स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे संस्थांपित आणि शिवनिकेतन ट्रस्ट संचालित भारतीय सैनिकी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय , कल्याण तालुक्यातील खडवली, जि. ठाणे  येथे शैक्षणीक वर्ष २०२१ - २२ मध्ये इयत्ता १२ वी. सायंन्स मध्ये शिक्षण घेत असलेला कु. राज काळे याच्या या घवघवीत यशासाठी पुणे येथील अनीस डिफेन्स कॅरिअर अकॅडमी चे संचालक तथा गण

सामाजिक न्याय विभागाची आघाडी

अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्यायाची आघाडी   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच या शासनाने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. या दोन वर्षाच्या काळात अनेक क्षेत्रात दमदार कामगिरी करून केवळ जनसेवा म्हणूनच या राज्याला अग्रेसर करण्याचे अनेक निर्णय घेतले आहेत. कोकण विभागात सामाजिक न्याय विभागातही खूप मोठे कार्य उभे राहीले आहे. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचे संनियंत्रण सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले. या स्मारकाची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक १४ एप्रिल २०२४ पूर्वी पूर्ण उभारण्यात येणार आहे.या स्मारकाचे काम प्रगतीत आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या शहरापासून महाविद्यालयाचे अंतर ५ कि.मी.वरून वाढवून १० कि.मी. पर्यंत करण्याचा निर्णय, त्याचबरोबर आता तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे. राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात बदल करून आता वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचादेखील विचार केला जात आहे. प्रथमच योजनेचा कोटा १०० टक्के पूर्ण. फा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख हरवले : छत्रपती संभाजीराजे

Image
छत्रपती संभाजीराजे यांनी वाहिली जनरल रावत यांना श्रद्धांजली : फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जुन्या आठवणींना दिला उजाळा... चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत ,  श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले ,  हे मनाला अजूनही पटत नाही. २०१७ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते. छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते ,  तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा ,  यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची

रायगड भेट माझ्यासाठी तीर्थयात्राच:- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Image
अलिबाग :-  रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.       यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे,  खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, राष्ट्रपती महोदयांची कन्या स्वाती कोविंद,  युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.        राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद आपल्या भाषणात पुढे म्हण

ओबीसी आरक्षणसाठी पहिली ठिणगी

Image
ठाणे :  कल्याण पश्चिम येथील, दामोदर हॉल मध्ये , मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी चिंतन शिबिराचे  रविवार दिनांक  5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता  आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाचे आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल झाल्यानंतर सदर चिंतन शिबीर ही पहिली ठिणगी ऐतिहासिक कल्याणमध्ये पडणार आहे.       मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे! यासाठी सर्व संघटना मध्ये व्यापक सहमती, आणि एकवाक्यता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कल्याणमधील मराठा समाज एकवटला आहे.  मराठ्यांना आरक्षण हे संविधानाने नाकारले नाही तर राजकीय पक्ष आणि नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने नाकारले आहे अशी भावना समाजात तयार झाली आहे. त्यामुळे यापुढे संविधान संमत ओबीसी आरक्षण मराठ्यांना मिळवून घेण्यासाठी कल्याण येथे मराठा समाज धडकणार आहे.          या शिबीरास राज्यातल्या सर्व मराठा संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी, तसेच मराठा समन्वयकांनी उपस्थित रहावे . यासाठी सामुहिक प्रयत्न होणे गरजेचं आहे . संघटनांच्या संपर्कात असणार्या मराठा बांधवांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि उपस्थिती साठी आणि कायमस्वरूपी 5