Posts

सृजनांची चळवळ...

       अहिंसा, सत्य, अस्तेय अशी मुल्ये आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी पुस्तकी तत्वे यांचा प्रत्यक्ष समाजजीवणाशी सबंध विसंगत वाटु लागतो तेंव्हा परिस्थितीच्या अंधारातुन सर्वशक्तीनीशी प्रकाशाकडे जाण्याचा प्रवाह तयार करावा लागतो. हाच मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्रजासत्ताक गणराज्य हि अशीच सर्वसमावेशक आदर्श संकल्पना आहे.  शिवाय ती लवचिकही आहे. हा यज्ञ असाच अखंडपणे सतर्क राहुन तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. पत्रकारिता हे निमित्त मात्र माध्यम असले तरी यासाठी प्रभावीपणे वापरत आहोत. आज पत्रकारिता आणि संघटणा हि सत्तास्थाने बनली आहेत मात्र आम्ही शाळेची पायरी चढताना राजकारण करणार नाही! आजी माजी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपिठ मिळावे या उद्देशाने  साने गुरूजींच्या विचार विश्‍वात पुन्हा शाळेकडे परत येण्याचा आमचा माणस आहे कारण परिवर्तणाचा मार्ग शाळेतुनच जातो!        दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवुन कांही गुणी विद्यार्थी कमावण्याचा आमचा मानस आहे             उगाच पाय न ओढता प्रोत्साहण देणारे आमच्या गावचे लोक असल्याने कुणाचाही विरोध न होता प्रोत्साहनासाठी संघटणेच्या फलकांच्या अ

श्रेष्ठ भारत महोत्सवाचे आयोजन

Image
नवी दिल्ली :- येथील सनड्रीम डिजी प्रा. लि. तर्फे आंध्रा असोसिएशन ऑडीटोरियम मध्ये नुकताच श्रेष्ठ भारत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत राज्य मंत्री आणि उद्योग मंत्री मुविन गोडींहो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील एक भारत श्रेष्ठ भारत आनुसार सनड्रीम डिजी प्रा. लि. चे अध्यक्ष प्रताप नायडू यांच्या वतीने दिल्लीच्या आंध्रा असोसिएशन ऑडीटोरियम मध्ये नुकताच श्रेष्ठ भारत आणि महोत्सव साजरा करण्यात आला.  यामध्ये काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसाम यामधील संस्कृतीचे प्रदर्शन तसेच हस्तकलांमध्ये तयार झालेल्या वस्तूंची प्रदर्षोनी करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत राज्य मंत्री आणि उद्योग मंत्री मुविन गोडींहो प्रमुख अतिथी म्हणून तर भाजप राष्ट्रीय प्रवक्ते टॉम वाढक्कन आणि आनंद डेअरीचे अध्यक्ष राधेश्याम दीक्षित सुद्धा उपस्थित होते.

लाईटहाऊस तर्फे कल्याण डोंबिवलीतील सामाजिक संस्थांचा मेळावा संपन्न

Image
डोंबिवली:- कल्याण डोंबिवली महानगरपालिका व लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आयोजित "सामाजिक संस्थांचा मेळावा" दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी डोंबिवली लाईटहाऊस या ठिकाणी पार पडला.    या मेळाव्यामध्ये कल्याण डोंबिवली प्रभागातील ३७ सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शवला असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. चंद्रकांत जगताप, सहाय्यक आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका (फ वॉर्ड) व डॉ.अरुण पाटील एम. एस. संजीवनी हॉस्पिटल, मा. जयश्री कर्वे, डोंबिवली महिला महासंघ हे होते.  सर्व सामाजिक संस्थांनी "युवक व युवकांच्या बदलत्या करिअर विषयी अपेक्षा" यावर चर्चा करण्यात केली. या सर्व सामाजिक संस्था विविध विषयावर जसे रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण अशा विविध विषयांवर कल्याण डोंबिवली विभागात काम करत आहेत.  सर्व सामाजिक संस्थांनी आपापल्या कामाबद्दल इतर सामाजिक संस्थांना माहिती दिली जेणेकरून ह्या सर्व संस्था एकत्रितपणे समाज विकासाचे काम करू शकतात.  कार्यक्रमादरम्यान झोपडपट्ट्यांमधील युवकांसाठी सामाजिक संस्थेने कसे एकत्र येऊन काम करावे याबद्दल मार्गदर्शन मा. श्

सारथी शिष्यवृत्तीचा लाभ घ्या !

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा लागेल? या विषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे कडून मागविण्यात येतात. SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील इयत्ता नववी ते अकरावी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमहा 800 रुपये प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता ९ वी, १० वी व

*चला तर...मृत्यूनंतरही माणुसकी जिवंत ठेवूया... अवयवदान करूया!*

    भारतीय संस्कृतीत "दान" या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यापैकी रक्तदान, नेत्रदान याविषयी समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी "अवयवदान" हा सुध्दा राष्ट्रीय उपक्रम देशात राबविण्यात येतो. आजपावेतो वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रात भरपूर संशोधन करून नवनवीन शोध लावले आहेत आणि अजूनही काही शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत.       सन १९५४ साली पहिल्यांदा "अवयवदान" करण्यात आले. त्यावेळी रोनाल्ड ली हेरिकने किडनी दान करून स्वतःच्या भावाला नवजीवन दिले. त्याचवेळी डॉ.जोसेफ मरे यांनीही पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण केले. या मानवतावादी कार्यासाठी डॉ. जोसेफ मरे यांना 1990 साली शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.    दरवर्षी दि.१३ ऑगस्ट रोजी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, लोकांमधील भिती दूर होण्यासाठी "जागतिक अवयवदान दिवस" जगभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. तसेच हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव गरजू व्यक्तीला दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. मूत

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू...

            केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. 14 जुलै 2022 च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. 19 मे 2023 च्या पत्रानुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे.             प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरित्या भरपाई मिळावी, जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ दोन टप्प्यात रु. 5 पाच हजार देण्यात येईल. जर दुसरे अपत्य मुलगी झाले तर मुलीविषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात रु. 6 हजार लाभ देण्यात येणार आहे.             गर्भवती व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी या योजनेंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यात रु.5 हजार तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात रु.6 हजार लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्य

मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक योजना

            कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी..!” हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या लेखातून...                 सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच अनुसूचित जाती व अनुसचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्या

🚩शिकागो येथिल सर्व धर्म परिषदेस प्रा नामदेवराव जाधव यांना निमंत्रण🙏

Image
संभाजीनगर :- जगातील सर्वोच्च व्यासपीठ समजली जाणारी सर्व धर्म परिषद या वर्षी दिनांक 14ऑगस्ट ते 18ऑगस्ट या कालावधीत शिकागो अमेरिका येथे संपन्न होत आहे. या सर्व धर्म परिषद साठी हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधत्व करण्यासाठीचे निमंत्रण नुकतेच प्रा. नामदेवराव जाधव ज्येष्ठ इतिहासकार प्रसिद्ध लेखक आणि जागतिक कीर्तीचे वक्ते यांना मिळाले आहे.           आपणा सर्वांना कल्पना आहेच की या पूर्वी जेव्हा शिकागो येथे 1893 साली जी सर्व धर्म परिषद झाली होती तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म आणि भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता तब्बल 130वर्षानंतर हा बहुमान पुन्हा भारताला मिळाला असून  हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसधी प्रा. नामदेवराव जाधव सर यांना मिळाली आहे. या कार्यक्रमासाठी चे तसे अधिकृत निमंत्रण त्यांना मिळाले असून शिकागो येथील सर्व धर्म परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. प्रा नामदेवराव जाधव शिकागो येथे हिंदू धर्म आणि मानवाधिकार या आजच्या ज्वलंत प्रश्नावर बोलणार असून हिंदू धर्म कसा जगातील सर्वात प्राचीन आणि महान आहे आणि तो मानवाधिकार या स