Posts

Showing posts from June, 2022

योगदिनी उत्थानयोग ! सत्यमेव जयते फाउंडेशनचा उपक्रम...

Image
*उत्थान योग आणि सत्यमेव जयते फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिन साजरा*  (अंबरनाथ) येथील उत्थान योग आणि सत्यमेव जयते फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा  जागतिक योग दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर योग शिबिराला जमलेल्या साधकांनी योग प्रात्येक्षिकासहित सिंगिंग बाऊल ध्यान पद्धतीचा देखील अनुभव घेतला. योग एक असं शास्त्र आहे जे शारीरिक, मानसिक,आध्यात्मिक,सामाजिक ह्या सर्व स्तरावर अगदी प्रभावी काम करते. समाजातील सर्व वयोगटातील लोकांनी दिवसातील ठराविक वेळ राखून ठेऊन नियमित योगाभ्यास केला पाहिजे.  त्यामुळे सर्व साधकांच्याकडून योगशिक्षक अविनाश सर यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली व योगाचे फायदे सर्वांना समजावून सांगितले. तर योगशिक्षक जितेंद्र सरांनी सिंगिंग बाउल ध्यान पध्दती करून घेतली. उपस्थित सर्व साधकांनी मिळालेल्या योग माहिती बद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी उत्थान योग व सत्यमेव जयते फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.  सदर कार्यक्रमाला सत्यमेव जयते फाउंडेशनचे  अध्यक्ष संदीप मेंगाणे, संस्थापक सुनील बोरनाक, संत साहित्य अभ्यासक मुक्त पत

*अखेर तारापूर प्रकल्पग्रस्तांचे तोंड उघडले :-*

Image
गेल्या 30 ते 35 वर्षात हे ना ते कारण सांगून तारापूर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणा-या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे भांडे उघडे झाले आहे. दोन गावांचे पुनर्वसन हे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विस्तारासाठी नसून केंद्र सरकारच्या INRP प्रकल्पासाठी असल्यामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हे पोफरण व अक्करपट्टी या दोन गावाच्या मुलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. येथील घरांच्या निकृष्ठ बांधकामामुळे शेकडो घरांची पडझड झाली असल्यामुळे व कमी आकाराचा भूखंड मोठ्या कुटुंबांना दिले असल्यामुळे कौटुंबिक वादामुळे व अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहसाठी पर्याय नसल्यामुळे अनेक कुटुंबे 17 वर्षानंतरही नवीन गावात राहण्यासाठी आली नाहीत, तसेच नवी पोफरण गाव समुद्रापासून 8 किमी अंतरावर असल्यामुळे  मच्छिमार समाजाची किमान 450 कुटुंबे समुद्रापासून 8 किमी अंतरावर जावून करणार काय? असा प्रश्न मच्छिमार कुटुंबियांना बेळसावत आहे. गेल्या 35 वर्षात प्रकल्पाने फक्त 72 प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरूपी नोकरी दिली आहे. याआधी प्रकल्पाने प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला कायम स्वरूपी  नोकरी देण्याचे आश्वसीत केले अस

संताजी घोरपडे यांचा खून व गद्दार माने ...

Image
          मोगल इतिहासकार खाफिखान याने सरसेनापती        संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन,सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या खालील वर्णनातून दिसून येते..   " समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे."  युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत.      याशिवाय इतकेच काय पण बादशहाच्या छावणीत घुसून तंबूचे कळस कापून आणणारे, आपल्या वेगवान आणि अनोख्या युद्धनितीने मोगलांना सळो की

अग्निपथ’ योजनेद्वारे लष्करात तरुणांना संधी मिळणार

भाजप प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन    मुंबई :- मोदी सरकारने मंजुरी दिलेल्या अग्निपथ योजनेमुळे तरुणांना लष्करात काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. प्रसिद्धी पत्रकात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, सशस्त्र दलात इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी अशी त्यांची रँक असेल. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर, संघटनात्मक आवश्यकता आणि सशस्त्र दलांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, अग्निवीरांना सशस्त्र दलात कायमस्वरूपी नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरांच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीच्या २५ टक्क्यांपर्यंत सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल.सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची रचना करण्यात आली आहे. सैनिकांचा गणवेश परिधान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना या योजन