Posts

Showing posts from November, 2015

भूमिका

Image
          ग्रामीण भागातील तरुण हुशार,सामर्थ्यशाली,मेहनती आणि प्रामाणिक असतो मात्र गरिबीमुळे तसेच संधी न  मिळाल्यामुळे तो काम धंद्यासाठी शहरात विस्थापित होतो तेंव्हा एकाकी पडतो व घाबरतो… नेमके काय करावे याचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वेळ आणि पैसा वाया घालवण्याचीही वेळ त्याच्यावर येते असा बहुतेकांचा अनुभव आहे. पुढे याच विद्यार्थ्यांची परिस्थिती 'ना घरका ना घाट का' अशीच होते ! खरी भारतीय संस्कृतीखेड्यात आहे असे महात्म्यांनी सांगून ठेवले आहे मात्र महाराष्ट्रात खेडी ओस पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील नागरिकांना आपापल्या गावाचा शाश्वत विकास व्हावा व शहरातील सुखसोयी आणि संधी ग्रामीण भागात निर्माण व्हाव्यात असे वाटत असते. त्यानुसार यथाशक्ती आपल्या जडण-घडणीस कारणीभूत असणाऱ्या ग्रामीण भागातील  शिक्षण संस्था,सामाजिक संस्था यांचे उतराई होण्याचा प्रत्येकजन प्रयत्न करत असतो. या विचारसरणीच्या लोकांचा हा समूह असून चांगल्या समाजासाठी  आदर्श विध्यार्थी पुरस्काराच्या निमित्याने सुरु झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील  आजरा-भुदरगड तालुक्यातील नवा आणि प्रथम अविष्कार आहे. वैभवशाली राष्ट्राच्या निर्मि

संविधान दिनाच्या शुभेच्छा !

Image

माजी विद्यार्थी मेळावा

Image
लक्ष्मी माध्यमिक विद्यालय बेगवडे व माजी विद्यार्थी संघटना झुलपेवाडी- बेगवडे यांच्यातर्फे शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर २०१५  रोजी  आजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. यावेळी शाळेच्या व  उत्तूर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. मटाधिपति श्रीपाद बुवा; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक फारूक नाईकवडि; दै. सांजवातचे संपादक प्रफुल्ल फडके,गाव विकास समितीचे सुहास खंडागळे व भाग्यश्री प्रधान आणि दोन्ही गावातील मान्यवरमंडळी  उपस्थित राहणार आहेत.सदर मेळाव्यास जास्तीत जास्त विध्यार्थी व नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाबुराव खेडेकर यांनी केले आहे. प्रशालेच्या गेल्या १० ब्याचेसचे माजी विध्यार्थी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. कार्यक्रमाची जय्यत तयारी सरू असून दोन्ही गावात व उत्तूर परिसरात या कार्यक्रमाचीच चर्चा सुरु आहे.