Posts

Showing posts from 2020

मराठेशाहीसाठी चिपळूणच्या लढाईत शहीद झालेल्या गोळे घराण्याच्या बलिदानाचे स्मरण..

#चिपळूणच्या_गोविंदगडावरची #चित्तथरारक_ऐतिहासिक_घनघोर_लढाई सर्व दुर्ग मित्रांना, दुर्ग अभ्यासकांना, दुर्ग भटक्यांना नमस्कार मित्रांनो इतिहासाची पाने जेवढी उलगडून पहिली जातात, वाचली जातात तेवढा इतिहास हा जगासमोर आणता येतो, इतिहासाचा अभ्यास करत असताना, नवनवीन संशोधन करताना कधी कधी आपल्याच घराण्याचे जर मूळ पत्र सापडले तर जो आनंद मिळतो त्याला जोड नाही, इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, यांनी जवळपास 350 साडेतीनशे गड, दुर्ग स्वराज्यत समाविष्ट केले, काही नवीन बांधले, अन त्याच गडांमुळे नंतरच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य हे अटकेपार झेंडा लावण्यात यशस्वी झाले, प्रत्येक गडावर रणसंग्राम झाला आहे, प्रत्येक दुर्गावर घनघोर युद्ध झाले आहे, अन प्रत्येक लढाईत आपला मराठा मावळा सरदार हा निकराने झुंज देऊन गडावर भगवा झेंडा फडकवला आहे, अशीच एक घनघोर, चित्तथरारक लढाई रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गोवळकोट गिरिदुर्ग वर झाली, साधारण पणे इसवी सन 1660 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोवळकोट व अंजनवेल हे दोन किनारी दुर्ग स्वराज्यात समाविष्ट केले त्यांची नावे अनुक्रमे गोविंदगड अन गोपाळगड अशी ठेवली पुढे छत्रप

योगशिक्षक अविनाश लोंढे यांचा योगप्रवास

Image
"योग : दहा वर्षाचा प्रवास"         वर्ष २०१०.त्यावेळी मुंबईच्या बांद्रा येथे एका खाजगी कार्यालयामध्ये मी काम करत होतो .मला ऑफिस टू  ऑफिस कामानिमित्त  दादर ला जावे लागत असे. त्यावेळी चार-सहा महिन्यातुन केव्हातरी एकदा कंबरेत दुखू लागायचं. मग २००४ साली दहावीला असताना श्री मुळीक सरांनी आमचे  दररोज शाळेत योग वर्ग घेतले होते ते आठवलं. आणि दादर हे खेळांचे माहेरघर .म्हणून आमच्या दादर च्या ऑफिस मधल्या मित्राला विचारले. दादर मध्ये योग वर्ग कुठे चालतात..? तो म्हणाला..शिवाजी पार्कात.. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात.             माझी ड्युटी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत असे. त्या वेळी मी डिलाइल रोडला राहत असे. त्या दिवशी कामावरून घरी न जाता मी थेट वीर सावरकर स्मारकात चौकशीला गेलो. सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली. ते म्हणाले थोड्या वेळाने मॅडम येतीलच तुम्ही त्यांना भेटू शकता. मग बाहेरच गणपती मंदिर आहे. त्या कठड्यावर बसून राहिलो. पाचच्या सुमारास  मॅडम आल्या. त्या जवळच राहत होत्या. त्यावेळी त्यांना वाटलं सुद्धा नसेल की  त्यांना  मी आयुष्यभर माझे गुरू मानणार आहे. त्यांनी सगळी माह

आठवणीतील नागपंचमी :- संदीप मेंगाने

प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथाकार मा. संदीप मेंगाणे यांच्या आयुष्याच्या आठवणींच्या सरोवरातील  एका अमृतमयी आठवणींचा सारांश...  *आठवणीतील नागपंचमी**                आषाढ संपला की श्रावणातल्या चैतन्यमयी उत्साहाने निसर्ग अगदी फुलून जातो.शिवार हिरवाईनं खुलून जातं. आणि असंख्य सोहळ्यांची पर्वणी घेऊनच जणू श्रावणाची सुरुवात होते. आणि मग एकापाठोपाठ एक अशा उत्सवाची जणू रांगच लागते. त्यातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. हा सण खास करून महिलांना खुप आवडतो.आमच्या घरी नागपंचमी च्या अगोदर पासूनच माहेरवाशीण पोरींची सोबत जुन्या जाणत्या महिलांची फेर धरून टाळ्यांच्या ठेक्यात नागोबाची, आणि येणाऱ्या पुढील सणांची गाणी रोज मध्यरात्री पर्यंत चालायची. माझ्या घरी मातीपासून बनवलेल्या पंचमुखी नागाची पूजा केली जाते. येणाऱ्या नागाची तयारी माहेरवासिनी आधीच महिनाभरापासून करायच्या. आमच्या घरात तर संपूर्ण गावच खेळायला असायचा. हा सण म्हणजे आमच्यासाठी जणू दिवाळीदसराच. प्रत्येक घरात नागाची मूर्तीपूजा केली जाते .पण माझ्या घरी मातीपासून अडीच - तीन फुटी उंच मूर्ती बनवली जाते. मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती ही गावापासून दूर डोंगर

उल्हासनगर भाजपमे महत्वपूर्ण नियुक्ती

Image
उल्हासनगर भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदपर अश्विनी मढवी और अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदपर कपिल आडसुळ नियुक्त उल्हासनगर:- उल्हासनगर भाजप अध्यक्ष जम्नु पुरस्वानी इनके नेतृत्वमे भाजपकी मजबूत कार्यकारिणी गठीत हो रही है.शनिवार दिनांक २५ जुलैै २०२० को उल्हासनगर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष पदपर पुर्व कार्यकारिणीकी महासचिव अश्विनी मढवी इनको नियुक्त किया गया है और अनुसूचित जाती मोर्चाके अध्यक्ष पदपर कपिल आडसुळ इनको पुनर्नियुक्त किया गया है.नगरसेवक प्रदीप रामचंदानी इनके कार्यालयने उन्हे नियुक्तीपत्र दिया गया इसवक्त यहाँपर जिल्हाध्यक्ष जम्नुपुरस्वानी,नगरसेवक प्रदीप रामचंदानी,मनोज लासी,भाजप नेता आनंद शिंदे, युवामोर्चा अध्यक्ष सुमित मेहरोलिया और कार्यकर्ता उपस्थित थे. आमदार कुमार आयलानीजी ने उन्हे फोनपर बधाइ दी और भविष्यकी कामगिरीके लिये शुभकामनाये दे दी है.महिला युवा और अनुसूचित जाती मोर्चा मजबूत बनाने का निर्धार यहाँपर किया गया.... 

कार्यकर्ता ते प्रदेश अध्यक्ष :- युवा नेते विक्रांत पाटील यांचा प्रवास

Image
 एक कार्यकर्ता भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष पदी; विक्रांत बाळासाहेब पाटील नवे प्रदेशाध्यक्ष. मुबई:भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी भाजप प्रदेशाध्यक्ष मा श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच जाहीर केली.पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम व्यक्तींना या कार्यकारणी मध्ये स्थान देण्यात आले आहे.भाजपामध्ये महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या युवा मोर्चा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद हे  विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने रायगड जिल्ह्यातील पनवेलला प्राप्त झाले आहे. संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिले गेल्याने महाराष्ट्रातील युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे व समाधानाचे वातावरण आहे. या पूर्वी विक्रांत बाळासाहेब पाटील हे भाजपा युवा मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. तसेच ते पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत. एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व, अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्याची कार्यशैली अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम वक्ता प्रभावीपणे

कविवर्य संदीप मेंगाने (शादपुत्र उमाकांत) यांच्या सचित्र कवितांचा खजिना

Image

कविवर्य संदीप मेंगाने यांच्या गुरूविषयी कविता

Image
*माझे गुरु* परिस्थिती जाण विचार महान साधेच राहणं गुरु जाण.... रंगानं गव्हाण मोठालं आव्हान मास्तर चव्हाण गुरु माझे.... विचारांची दिशा ज्ञान दरवेशा भविष्याची आशा गुरु माझे.... गौरवर्ण मूर्ती आदर सन्मार्थी चौफेरची कीर्ती गुरु माझे... जरी मी हुशार छड्डीचाच मार चव्हाण मास्तर गुरु माझे.... सोनियाची खाण ज्ञानाचा दिवाण बाबुराव चव्हाण गुरु माझे.... संदीप मेंगाणे. 7021463427. : *माझे गुरु....* सोनियाची खाण विद्ववतेची जाण बाबुराव चव्हाण         गुरु माझे.... जरी मी हुशार छडीचा मार चव्हाण मास्तर         गुरु माझे.... विद्यार्थ्यांची जाण समाजाचे भान माझा अभिमान         गुरु माझे.... शाळेची शान बुद्धीचे वरदान चारित्र्य महान          गुरु माझे.... अमृताचि ऐशा विचारांची दिशा भविष्याची आशा          गुरु माझे.... संयमाची मूर्ती आदर सन्मार्थी चौफेर कीर्ती          गुरु माझे....        - संदीप मेंगाणे          7021463427          ( गुरुपौर्णिमा ) *गुरु माझी....* दिव्यत्वाची नाव प्रेमळ स्वभाव चैतन्याचा गाव           गुरु म

महाराष्ट्राबद्धल अमराठी लोक काय विचार करतात बघा !

Image
अभीतक आपने केवल मुंबई पुणे नाशिक जाना है कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा और विदर्भ मराठवाडा बाकी है फिर महाराष्ट्रकी बहुत बडी और स्वावलंबी स्वाभिमानी आबादी गाव मे भी बसी है इसका अंदाजा होगा ! अच्छा प्रयास था मगर कम समय मे हम महाराष्ट्रका वर्णन नहीं कर सकते यहीं सच है... देशकी सबसे जादा निर्वासित कामगारको अपनी पनाहो मे लेनेवाला पहेले नंबरका राज्य महाराष्ट्र ही  है ! शाहू फुले आंबेडकर के विचारधारा का विज्ञानवादी महाराष्ट्र यह नयी पहेचान देश को दिशा दे रही है और देती रहेगी !

आषाढी एकादशीवर तिन कविमित्रांच्या कविता

Image
१)  सर्वज्ञ..... विठ्ठल म्हणजे जोड विठ्ठल म्हणजे दौड विठ्ठल म्हणजे ओढ पंढरीची.... विठ्ठल म्हणजे भक्ती विठ्ठल म्हणजे शक्ती विठ्ठल म्हणजे मुक्ती अंधाराची.... विठ्ठल म्हणजे सागर विठ्ठल म्हणजे आगर विठ्ठल म्हणजे जागर नामाचा.... विठ्ठल म्हणजे नाती विठ्ठल म्हणजे ख्याती विठ्ठल म्हणजे साथी चुकलेल्यांचा.... विठ्ठल म्हणजे शिकवण विठ्ठल म्हणजे आठवण विठ्ठल म्हणजे गोठवण पापपुण्याची...!          -अविनाश लोंढे           9821896825          ( ३०/०६/२०) (२)  उन्हा तान्हात कष्टानं झिजते बापाचे अंग श्रध्दा मातीवर त्याची माझा तोच पांडुरंग.... माय पेरते धान्य पीक येई तरारूनी माया शेतावर तिची माझी तीच रुक्मिणी.... येता दिवस सुगीचे तुटती काळजीची पिसे पीक पाहुनी बापाला पिकांत " विठ्ठल "दिसे...!           - सुनिल शिवाजी खवरे             9820992502 (३) *आम्ही वारकरी... नाममात्र..* आम्ही वारकरी नित्यनेम करी आषाढवारी गुणदोषांची... तूच सुख दाता दुःख निवारिता करता करविता भाविकांचा  ... दुःखाचा डोंगर अवघ्या जगभर बा आवर आवर कोरोनाला..

शेतकऱ्यांचा खरा मित्र

Image

Unlock Special Speech !

Image

कस्टमरने जब एजंटकी कमिशनपर सवाल उठाया...

Image

Big Success Story of BMS

Image
This Govt led by Shri Modhiji and all his ministers recognize, honour, respect 'Bharatiya Mazdoor Sangh logo'  only in labour related issues. One must understand Shri Amit Shaji, Shri D V Sadananda Gowdaji, Smt Nirmala Sitaramanji are hard core rightists. Since 2015 this Government is not entertaining any other unions/associations regarding service related issues of Employee bodies, except Bharatiya Mazdoor Sangh affiliated unions. No individual effort, no personal effort can play any role or influence at Ministry level, as most of the Ministers are well aware what is going on, in all the Govt institutions like RBI. Today's result of opening of Pension option is because of efforts since 2015 by Central BMS leaders, their proximity to Ministers & Ministry; More importantly BMS logo in the letter head, BMS proximity to Govt being wing of Sangh Parivar; Meeting with Madam in January 2020, Shri D V Sadananda Gowdaji's continuous efforts being in position as number

किल्ला अभ्यास :- चावंडगड

*★ चावंड उर्फ प्रसन्नगड ★* *{ पुणे जिल्हा }...* जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. जुन्नर तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. यालाच चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे. माहिती चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥ गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥ *इतिहास* १) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. २) दुसरा बुर्‍हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता. ३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड

मराठ्यांचे सरसेनापती धनाजीराव जाधव

Image
*⛳मराठ्यांचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचा आज स्मृतिदीन..⛳👏* संताजी घोरपडे यांच्या मृत्युनंतर मोगलांविरूद्ध यशस्वीपणे लढा देण्याचे श्रेय सेनापती धनाजीराव जाधव यांचे. छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी मोगल फौजांशी अनेक धावपळीच्या लढाया केल्या व मोगल सरदारांना आपल्यामागे मोठी पायपीठ करण्यास भाग पाडले. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई सरकार यांच्याकाळात गुजरातमधील बडोद्यापासून ते धारवाड़ आणि कारवार पर्यंत आपल्या लष्करी मोहिमा चालवल्या अनेक मोगल शहरे मारली इतकेच काय खुद्द बादशाहच्या छावणीवर हल्ले चढ़वले. धनाजीराव जाधव यांच्या या उपक्रमामुळे बादशाह इतका हवालदिल झाला होता की त्याने धनाजीराव जाधव यांच्याशी लढणाऱ्या सरदारांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांना खास मंतरलेले ताईत पाठवून द्यावे लागले. तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडात ही सेनापती धनाजीराव जाधव यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आणि त्यातच त्यांचा पायाला ईजा होऊन नैसर्गिक मृत्यू झाला.. तब्बल ५ छत्रपतींच्या कारकिर्दीत आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दगिरीन

छत्रपती शाहू महाराजांना वंदन !

Image
 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची हिंदुधर्मविरोधी प्रतिमा रंगविण्याऱ्या पुरोगामी आणि ब्राम्हण विरोधी प्रतिमा रंगविण्याऱ्या जातीयवादी औलादींपासून सावध रहा! शाहू महाराजांनी आयुष्यभर हिंदू धर्मातील समानतेसाठीच प्रयत्न केले होते! न्यू पॅलेस , कोल्हापूर येथील महाराजांचा अर्धाकृती पुतळा अन त्याखाली ताम्रपटात कोरलेल्या त्यांच्या उपाध्या (कर्नल हिज हायनेस सोडून) ज्या दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषिक्त झाल्यापासून छत्रपती घराण्यात छत्रपती पदासमोर लावल्या जातात! सदर ताम्रपटावर शाहू महाराजांची मुद्रा कोरलेली आहे जी संस्कृत मध्ये आहे ,महाराजांचे पूर्वज हिंदुपदपादशहा, छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा सुद्धा संस्कृत मध्येच होती हे लक्षात घेतले पाहिजे! अन हिंदू धर्म, संस्कृती तथा परंपरा यांवर जातीवादाच्या आडून चिखल उडविणाऱ्या समाजविघातक संघटना व विचारांपासून अंतर राखले पाहिजे..!! जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांना वंदन.. क्षत्रियकुलावंतस🚩  हिंदुपदपादशाहा ⚔️🚩 आरक्षणाचे जनक शाहू छत्रपती जय हिंदूराष्ट्र

किल्ला अभ्यास :- शिवनेरी

*#शिवकालीन_महाराष्ट्रतील_किल्ले_भाग-१* *★ #शिवनेरी_किल्ला Shivneri Fort ★* *{ पुणे जिल्हा }* *नाव : शिवनेरी* *उंची : ३५०० फूट.* *प्रकार : गिरिदुर्ग* *चढाईची श्रेणी : मध्यम* *ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत* *जवळचे गाव : जुन्नर* *डोंगररांग : नाणेघाट* *स्थापना : ११७०* ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. *◆इतिहास :* ‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर

वाईचा_शिवकालीन_इतिहास

वाईचा_शिवकालीन_इतिहास 🛡⚔️🛡             वाईचा_इतिहास_तसा_जुनाच_वाईपासुन_कोरेगावप र्यंतच्या_प्रदेशास 'वायदेश' संबोधले जात असे. 14 व्या शतकापर्यत वाई हे बहमनीचे लष्करी ठाणे म्हणून ओळखले जात होते त्यानंतर अनेकदा वाई मिळवण्याकरिता मराठा व 'निजामशाही-आदिलशाही-मुघल' यांच्यात प्रचंड मोठा संघर्ष झाला.......... पेशवाई येईपर्यंत वाई कधीच सलगपणे मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिली नाही....... वाई मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष मराठे व 'निजामशाही-आदिलशाही-मुघल' यांच्यात झाला पण हा संघर्ष इतिहास जाणकारांने कधीच प्रकरतेने मांडला नाही म्हणूनच वाईचे महत्व इतर प्रांताच्या तुलनेने साधारणच राहिले "...........!!!!                            " साधारण इ. स 1481 पासुन वाई ही 1489 पर्यंत आदिलशाहीकडे होती त्यानंतर वाईची सत्ता ही निजामशाहीकडे इ. स. 1551 पर्यंत आली. या 100 वर्षाच्या कालवधीत वाई कधी आदिलशाहीकडे राहिली तर कधी निजामशाहीकडे पुढे निजामशाही राजवटीचा अंत झाला........ त्यानंतर वाई अनेक काळ ही आदिलशाहीकडेच राहिली ".........!!!!                             "

किल्ला अभ्यास :- वज्रगड

*★ वज्रगड / रुद्रमाळ – Vajragad ★* *{ पुणे जिल्हा }...* *वज्रगड / रुद्रमाळ – Vajragad* *चढाई श्रेणी: कठीण* *जिल्हा: पुणे* *तालुका: पुरंदर* वज्रगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३४८ मीटर एवढी आहे. पुणे जिल्ह्यातील वज्रगड अथवा रुद्रमाळ या नावाने ओळखला जाणारा हा पुरंदरकिल्ल्या शेजारील गड. एका दंतकथेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवेंद्राने ज्या इंद्रनील पर्वतावर तपःसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. पुरंदर हे इंद्राचेच एक नाव आहे. इंद्रनील पर्वतरांगांवर बांधलेला हा किल्ला म्हणून त्याचे नाव ‘पुरंदर’ ठेवले गेले अशी एक दंतकथा आहे. तर ‘पुरंदराचे’ म्हणजे ‘इंद्राचे शस्त्र ते वज्र’ म्हणून किल्ले पुरंदरासमोर बांधलेला हा पुरंदराचा जुळा किल्ला म्हणजे ‘वज्रगड’. रुद्रेश्वर उर्फ शिव हा वज्रगडाचा अधिपती म्हणवला जातो. वज्रगडावर या रुद्रेश्वराचे एक मंदीरही आहे. या रुद्रेश्वराच्या अधिवासामुळे ‘वज्रगडाला’ रुद्रमाळही म्हणले जाते. याबद्दल एक पुराणकालीन दंतकथा अशीही सांगितली जाते की राम-रावण युद्धादरम्यान मुर्छीत झालेल्या लक्ष्मणासाठी मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वतच उचलून

मराठा_पायदळ

*#मराठा_पायदळ* *मराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ* पायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वात जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनिक काळातही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर सैन्याच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते. पायदळ सैनिकांची भरती मुख्यत: मावळे, हेटकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे. स्वतः शिवाजी महाराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदळच्या तुकड्या सज्ज असत. किल्लेदार शिपायांची हत्यारे स्वत:ची असत व दारूगोळा सरकारातून मिळे. पायदळात दहा माणसांचा दाहिजा (समूह) असून हवालदार, जुम्लेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत, सर्वात लहान तु

देसुरच्या किल्ल्याचा खरा इतिहास

*🚩🚩देसुरचा किल्ला. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष.🚩🚩* *🚩🚩जिंजीपासून ईशान्येस २१, किलोमिटरवर (१३,मैल) हा किल्ला आहे.*  *आजच्या घडीला हा किल्ला गावतल्या लोकांच्याही विस्मृतीत गेला आहे,* *ईथवर जर पोहोचायचे असेल तर पच्चई अम्मन कोवील या मंदीराची चौकशी करत जावे लागते.* *या मंदीराच्या पाठीमागे पडीक रानात हा किल्ला काही अवशेष ट्कवून जिवंत आहे.* *संपुर्ण किल्ला जरी काट्याकुट्यांनी माखला असेल तरी बारकाईने पाहिल्यास आजही किल्ल्याच्या अर्धवट भिंती नजरेस पडतात.* *एक बुरूज, एक पाण्याची विहीर व एक सभामंडप अाजही सुस्थीतीत आहेत.* *याखेरीज किल्ल्यात ५, पाच अतिशय सुंदर पाच फुटी विरगळी आढळतात.* *देसुर हे नाव मुळ तेज सिंग या नावातून उद्भवले आहे.*  *तेजसिंगाचा दक्षिणी तमिळ भाषेत देजसिंग असा अपभ्रंश होतो व पुढे ह्या देजसिंगचा देसिंग असा अपभ्रंश झाला.* *देसुर म्हणजे देसिंग उर (देसिंगाचे गाव).* *हा तेज सिंग म्हणजे स्वरूपसिंगाचा मुलगा.* *सन १७९८, ला जिंजी मराठ्यांकडून घेतल्यावर त्याठिकाणी स्वरूपसिंगाची नियुक्ती करण्यात आली.* *सन १७१४, ला स्वरूपसिंग मरण पावला व त्यानंतर पित्या