Posts

Showing posts from March, 2015

झुलपेवाडी आणि साने गुरुजी वाचनालय

ज्ञान,मनोरंजन आणि विकास हि आवश्यक त्रिसूत्री अजेंड्यावर ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील, आजरा तालुक्यातील झुलपेवाडी या गावच्या साने गुरुजी वाचनालयाची रौप्य महोत्सवी वाटचाल सुरु आहे.आज या गावाची ओळख सांगताना  दिल्ली वारी करून आलेले येथील भजनी मंडळ व तरुण भारत लेझीम पथक यांची जागा समर्थपणे साने गुरुजी वाचनालयाने घेतली आहे असेच म्हणावे लागेल. भुदरगड या घाट प्रांताला व कोकणाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक पायवाटेवरील हे गाव. येथील चिकोत्रा  नदीमध्ये पांडवांचे पाय लागून डोह तयार झाल्याच्या कथा आम्हाला लहानपणी सांगितल्या जायच्या. आज येथे चिकोत्रा मध्यम प्रकल्प हे धरण व धरणावरील गणेश मंदिर आणि वीजप्रकल्प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गावच्या वरच्या बाजूस बेगवडे गावामध्ये पांडवांनीच एका रात्रीत बांधलेले देऊळ पाहायला मिळेल. पानझडी वृक्षामुळे आजरा तालुका असला तरी भुदरगड आणि गडहिंग्लज तालुक्याशीच जवळीक साधणारे हे गाव आहे. पूर्वी चंदगड हा विधानसभा मतदार संघ होता आज त्याचा संबंध कागल मतदार संघाशी जोडला गेला आहे. पारंपारिक शेतीची जागा आता बागायती शेतीने घेतली असून ऊस,भात,गहू,भुईमुग,ज्वारी ई. पिके प्रामुख्याने येथ

सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी अभ्यास गटाची आवश्यकता

Image
  दिनांक ११ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत जाहीर केले की पुढील ३ महिन्यात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यात येईल.आपल्याकडे अनेक कायदे आहेत पण त्याची कार्यवाही सदोष असल्याने पळवाटा शोधून गुन्हेगार मोकाट सुटतो हा अनुभव जुनाच आहे. दारूबंदी,डान्सबार बंदी,गुटखा बंदी अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी समाजात फिरून स्वतः माहिती संकलन करत नसतात  तर ते समोर कुणीतरी तयार दिलेल्या  लेखी   माहितीवर शेरे मारत काम करत असतात .  जात पंचायती,गावक्या यांनी  वाळीत टाकल्याची उदाहरणे  फक्त  रायगड  जिल्ह्यात   नसून रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथेही आढळतील. पश्चिम महाराष्ट्रात भावक्या आपला हेकेखोरपणा खरा करत गावाच्या मालकीच्या  जमिनी परस्पर विकताना दिसतात. (अश्या गावकीच्या जमिनींचा ताबा आता सरकार घेत असल्याने कायद्याचे राज्य आहे अशी धारणा होण्यास थोडा वाव आहे.)गाव करील ते राव काय करील अशी मराठीत प्रचलित म्हण आहे. सरकारने सत्ताविकेंद्रीकरणाच्या सूत्रानुसार ग्रामपंचायतींना स्वायत्त अधिकार दिले आहेत. असे असताना गावक्या "हम करे सो कायदा" अश्या
Image

वाळीत प्रथेविरुद्ध कायदा करा !:-गाव विकास समितीची मागणी....

Image