आधी महागाई आणि बेरोजगारी या व्हायरसचा बंदोबस्त करा :- सुहास खंडागळे

*कठोर निर्बंध लादण्या आधी प्रचंड महागाई आणि बेरोजगारी हे दोन व्हायरस सामान्य लोकांच्या मानगुटीवर बसले आहेत याचा विचार सरकारने करावा- सुहास खंडागळे*

यांना पुन्हा परदेशातून नव्या कोरोनाचे(ओमॅयक्रोन) संक्रमण वाढतंय हे माहीत होतं...मागच्या वेळी चुका केल्या त्यातून हे काहीच शिकले नाहीत.परदेश वाऱ्या करणाऱ्यांना कंट्रोल करण्या ऐवजी सामान्य माणसांवर वारंवार निर्बंध लावण्याची भूमिका सरकार घेणार असेल तर सरकारने आधी लोकांच्या रोजी रोटीची व्यवस्था करावी!कोणतेही कठोर नियम लादण्या आधी कोरोना प्रमाणेच महागाई आणि बेरोजगारी हे भयंकर व्हायरस लोकांना जेरीस आणतायत याचं भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावं...!

बाकी नवीन व्हेरियन्ट बाबत नागरिक स्वतः काळजी घेत आहेत.लोक बेफिकीर आहेत असं जे बिंबवले जात आहे ते चूक आहे.दोन वर्षांच्या त्रासातून लोकं बरच काही शिकले आहेत...लोकं लोकांचं काम करत आहेत,सरकार आधी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे का?हे त्यांनी तपासून पहावं!

कोरोनाचे नवे व्हेरियन्त हे परदेशातून आला असेल तर याला देशात प्रामाणिक पणे रांगा लावून दोन दोन डोस घेणारी जनता दोषी कशी?
बाहेरून येणाऱ्या लोकांचे नियोजन तुम्हाला करता येत नसेल तर उपयोग काय?आज कुठे लोकांचे जीवन सुरळीत होत असताना पुन्हा बंधने घातली जाणार याची चर्चा सुरू झाली आहे... सरकारने सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे...विमाने यापुढे बंद ठेवा...कोरोना गेल्यावरच सुरू करा...काही लोकांसाठी बहुसंख्य लोकांना बंधनात ठेवणे योग्य नाही!

बाकी सामान्य माणूस कोरोनाचे सर्व नियम पूर्वी ही पाळत होता आजही पाळत आहे!

नियमांचा विसर नेत्यांना त्यांच्या गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमात पडत आहे!

*- सुहास खंडागळे*
#गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income