गरोदर मातांना मातृ वंदना योजनेचा आधार


माता सुदृढ राहिली तर जन्माला येणारी देशाची भावी पिढी सुदृढ राहते. त्यामुळे गरोदर महिलेच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा विविध कारणांमुळे गरोदर महिलेला सकस आहार मिळत नाही. गरोदरपणात अनेक महिलांना शारीरिक क्षमता नसतानाही मजुरी करावी लागते. त्याचा परिमाण तिच्या व होणाऱ्या बालकाच्या आरोग्यावर होतो. अशा महिलांना मदत व्हावीतिचे आरोग्य सुदृढ रहावेयासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली. या योजनेत नवीन लाभार्थ्यांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावीगरजू मातेपर्यंत योजनेचा लाभ मिळावायासाठी ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवा विभागाच्या वतीने १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या काळात मातृवंदना सप्ताह राबविण्यात येत आहे.

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावीजन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा असा या योजनेचा उद्देश आहे. गरोदर काळात माता, त्यानंतर शिशु सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व मातेला सकस आहार घेता यावा तसेच कुपोषणावर मात करता यावी  काम करणाऱ्या महिलेला अंशत: बुडीत मजुरी मिळावी यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे वरील सर्व बाबींमध्ये गर्भवती मातांना मदत झाली असून ही योजना गर्भवती महिलांकरीता वरदान ठरली आहे.

योजनेचे पात्रता निकष

पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा किंवा प्रसुती दि.01 जानेवारी 2017 रोजी अथवा तद्नंतर झाली असेल अशा महिला. या महिलांनी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असावी. कुटुंबातील केवळ पहिल्या जिवीत अपत्यासाठी लाभ मिळेल. पहिल्या खेपेच्या गरोदर व स्तनदा मातांना हा लाभ अनुज्ञेय आहे.

मात्र, ज्या गरोदर व स्तनदा माता या केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत अशा मातांना हा लाभ घेता येणार नाही. ज्या माता  अशा प्रकारचे लाभ इतर कोणत्याही कायद्यान्वये घेत असतील त्यानांही हा लाभ मिळणार नाही.

असा मिळतो लाभ

या योजनेअंर्गत दि.01 जानेवारी 2017 रोजी किंवा तद्नंतर पहिल्यांदा प्रसुती झालेली माता किंवा गर्भधारणा झालेल्या महिलांना तीन टप्प्यात पाच हजार रुपयांची रक्कम  लाभ म्हणून दिली जाते. पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासू १५० दिवसांत गरोदरपणाची नोंदणी केल्यानंतर  हजार रुपये दिले जाते. तर किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यापोटी  हजार रुपये लाभ दिला जातो. तिसऱ्या प्त्याची २ हजार रुपयांची रक्कम प्रसुतीनंतर पत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, पीव्ही, डीपीटी व हिपाटायटीस बी व त्या अनुषांगिक लसीकरणाचा पहिला पूरक खुराक दिल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

 

या योजनेचा लाभा घेण्याकरीता गरोदर मातेचे आधार कार्ड, तिच्या पतीचे आधार कार्ड व आधार संलग्न बँक खाते पासबुक किंवा पोस्ट खाते इत्यादी बाबींची आवश्यकता आहे. आपल्या निकट असलेल्या आशाताई, एएनएम ताई व अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून या योजनेसाठी लागणारे आवश्यक दस्ताऐवज देऊन या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income