प्रतिक्रिया इथे जतन करुया BLOG EFFECT !

शुभेच्छा..... यशस्वी भव!


२९ ऑक्टोबर २०१० ३-३१ pm रोजी creative maratha ने लिहिलेः

प्रिय गुरूजी ,
हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात !
आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत !
आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक संकल्पना,भावनिकता याना वाजवीपेक्षा जास्त स्थान नसेल !
मला एक गोष्ट कळत नाही चळवळ,भ्रष्टाचार विरोध,प्रबोधन,क्रांति ह्या गोष्टी आता हास्यास्पद का वाटतात लोकांना ? समाजमन हरवून स्वार्थी बनत चाललेल्या माणसाची इतकी भूक वाढत का चाललीय ?पैसा म्हणजेच वास्तव का झाले आहे ?ज्या देशाची ६० % पीढ़ी युवा आहे तो देश अजुन विकसित का नाही ?असे चालू राहिले तर शोषितांचे वर्ग पुन्हा निर्माण होऊंन अराजकता माजेल!संतांचा,विरांचा एकेकाळी आघाडिव्रर असनारा महाराष्ट्र सर्वच बाबतीत मागे रहत असताना आपन काहींच करू शकत नाही का ?ह्या प्रश्नाने शरमेने मान खली जाते आनी म्हणे आम्ही या मातितले भाग्यवान !
आमचे सर्व देव,राजे उंच गडावर जाऊन बसलेत.त्याना जाऊन सांगितले की तुम्ही आमच्यासाठी ठेवलेले हे विश्व खुप वाइट आहे ! तर ते माझ्याकडेच आशेने पाहताना दिसतात की मी या महाराष्ट्रासाठी पर्यायाने देशासाठी काय करतोय !
म्हनुनच आम्ही नवा महाराष्ट्र/ युवा महाराष्ट्र चा विचार केलाय.आता नाही तर केंव्हाच नाही!प्रवाहात राहून 'तोंड दाबुन बुक्यांचा मार' सहन होत नाही!प्रामानिकपने जिवंत मनाने एकाकी कम करनारया व्यक्ति आनी संघटननाना माध्यमच एक करू शकते. एक मजबूत माध्यमाची देशाला गरज आहे ! लहानपनापसून अताप्रयान्ताचा एकाकी संघर्ष मला सहजासहजी संपवायचा नाही.यंत्रनेला घाबरून कुत्र्यासारखे जीने आम्हाला मान्य नाही !
आपल्या उत्तराची मी वाट पाहत आहे
आपला अदन्याधारक
बाबुराव खेडेकर
मो-९९६९६६८३६६





--
आपला सविनय,
राममोहन खानापूरकर (कार्यवाह, मराठी अभ्यास केंद्र)...
चलभाष- ९८२००४००६६

- युनिकोड वापरा...मराठीला वाढवा...
- मणभर इमेलपेक्षा कणभर कृती लाखमोलाची
- ध्येयासाठी जळत राहणे
अणूरेणूतुन राख पावणे

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income