विचारांची पत्रकारिता Journalism Of Thought

विचारांची पत्रकारिता
Journalism Of Thought
पत्रकरित विचारांवर चालते;हे मान्य मात्र वेगवेगल्या विचारांची खुपच वृत्तपत्रे झाल्याने खरी बातमी कोणती हेच कळत नाही !कारन कोण ज्वलंत विचाराची असतात तर काहींच्या शब्दांना सत्याची धार असते! असो,मुद्दा हा ही लक्षात घ्यायला हवा की दलितांसाठी सम्राट धम्माशाशन लोकनायक अशी वृत्तपत्रे का निघाली !सामना का निघाले!कारन त्यांच्या बातम्यान्ना,विचारांना माध्यमांनी स्थान दिले नाही.मध्यमे धंदा बनल्याची आरोली दिसते. मराठी वाचकांनी संकोचित वृत्ति बाळगु नये !
पत्र नसलेली पत्रकारिता म्हणजे द्रुक श्राव्य माध्यमें एकाच घटनेभोवती दिवस काढताना दिसतात आनी नको त्या गोष्टिंकडे केवल टीआरपि साठी आपली सामुग्री खर्ची पाडताना दिसतात दुसरीकडे राजकीय पक्षांची मुखपत्रे बनलेली दैनिके पेड़ न्यूज़ साठी आनी मनोरंजनात गुंतल्यामुले लोकांची विश्वासार्हता या चौथ्या स्तंभा बद्धल मलिन होत आहे.
अभ्यासू पत्रकारांची कमतरता जाणवते अशी वाचकांची आज भूमिका आहे!नाहीतरी डेस्क वर बातम्या बनविन्याची पत्रकारांना सवय आहे असे दिसते !
या बाबतीत नियतकालिके आपला तोल संभालूंन आहेत आनी मराठी नियात्कालिकांची संख्या वृत्रपत्रणपेक्षा कमी आहे !
हीच हे पत्रकारितेतिल ग्लेमर दूर करून दर्जेदार पत्रकारितेचा पाया घालण्याची ! वृत्तपत्रे काढनारयांची पात्रता तपासायला हवी तरच बोगस पत्रकारांची समस्या दूर होइल ! शिवाय आपल्याकड़े पत्रकारितेचा दर्जा पाहणारे नियामक मंडल नाही ते हवे!पत्रकारितेचा अभ्यासक्रम देनारया संस्थांचा दर्जाही पहावा!२००९ च्या बॉम्बे कॉलेज ऑफ़ जर्नलिजम या सन्थेने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अजुन दिले नाही !आजच्या जगमगातात आपन आपली तत्वे विसरलोय अजूनही देश विकसनशील का राहिला ? आता जर पत्रकारितेचा वापर समाज हितासाठी करायचा असेल तर पत्रकारांनी वास्तवात जगायला हवे!तरच पत्रकारिता आपला पुर्वीचा मार्गदर्शक चेहरा मिळवु शकतील आनी दर्जेदार पत्रकारिता दिसेल!

बाबुराव खेडेकर

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income