गाव विकास चळवळीचा झेंडा

गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा या आपल्या जिल्ह्यातील तरुणांच्या संघटनेने गाव विकासा च्या चळवळीचा झेंडा प्रसिद्ध केला आहे.शेती,आधुनिक तंत्रज्ञान आणि आजच्या 21 व्या शतकातील माहिती तंत्रज्ञान याची सांगड घालून गाव विकासाचा नवा संकल्प या संघटनेने मांडला आहे.गाव विकास ही एक चळवळ झाली पाहिजे.गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे...विकासाच्या भूमिकेला चळवळीचे रूप प्राप्त झाले तरच शासनाचे लक्ष गावांच्या विकासाकडे जाईल, नाहीतर नेते आपला विकास करत बसतील,तेव्हा जागे व्हा...गाव विकास समिती ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही मात्र गावांच्या विकासाची भूमिका ठोस आहे...संघटनेकडे विकासाचे व्हिजन आहे...आणि म्हणूनच आपण तरुणांनी या संघटनेचे विचार गावा गावात पोहोचवायला हवेत...चला तर गाव विकास एक चळवळ करूया...सामान्य माणसाने सामान्य माणसासाठी उभारलेली चळवळ...

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा