Posts

Showing posts from 2025

रायगड जिल्ह्यातील दिवाळी !

शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव ठाणे :- (स्वरूप हुले) रायगड जिल्हा, म्हणजेच कोकणचा मानबिंदू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. या जिल्ह्याच्या कणखर मातीत दिवाळीचा सण केवळ दिव्यांचा उत्सव नसतो, तर तो ऐतिहासिक वारसा, समृद्ध कोकणी संस्कृती आणि शेतीतल्या कष्टाचं फळ यांचा एकत्रित सोहळा असतो. जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे येथील दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत शिवकालीन प्रेरणा आणि पारंपरिक कोकणी प्रथा यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. रायगड जिल्ह्यातील दिवाळीची वैशिष्ट्ये, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, दिवाळीच्या निमित्ताने विकसित झालेली खाद्य संस्कृती आणि दीपोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाविषयी जाणून घेवू या लेखातून… 1. रायगड जिल्ह्यातील दिवाळीची वैशिष्ट्ये आणि परंपरा रायगड जिल्हा कोकण किनारपट्टीवर वसलेला असल्याने येथील बहुतांश संस्कृती ही कृषी आणि समुद्रकिनारी जीवनावर आधारित आहे. दिवाळी हा सण नवीन पीक (भात) घरी येण्याचा काळ असतो, ज्यामुळे याला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होते. अ. किल्ले रायगडावरील दीपोत्सव: शिवकालीन मान...

Program on Vikasit Bharat Vision by SunDreams

Image
In Delhi, Sundreamsdigipvt Ltd. organized the "Vikasit Bharat" program on October 12, 2025, with NHPC as the sponsor. For this prestigious program as a dignitaries Smt Rosy Chapathi ji Nursing Incharge GTB Hospital, sri Gangadhar ji renowned Social worker was present. The program's objective was to promote the vision of the Honorable Prime Minister Shri Narendra Modi's "Vikasit Bharat 2047," which aims to transform India into a developed nation.  Organizer Pratap Palla and other distinguished guests utilized the program to raise awareness about "Vikasit Bharat." The government's initiatives, designed to foster self-sufficiency and professional development, were highlighted. Specifically, schemes such as Antyodaya Yojana, Make in India, Atmanirbhar Bharat, Skill Development, and Mudra Yojana were discussed. The program also recognized individuals who have achieved entrepreneurial success through these schemes. Participant...

"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ; मुंबई :- आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे. त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. शाश्वत विकास हा असा विकास आहे, जो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास हा आपल्या राज्याच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज अनेक गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा या मूलभूत गरजांसह रोजगार, माहिती तंत्रज्ञान, शाळांमध्ये शिक्षणाचा उच्च दर्जा, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रे तेथे औषधांची उपलब्धता, तज्ञ डॉक्टरांची सेवा अशा प्राथमिक चांगल्या सुविधा उपलब्ध करणे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करते.             या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाचा शुभार...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षगरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आशेचा किरण

मुंबई : आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य उपचार मिळविणे कठीण होते. याच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (Chief Minister Medical Assistance Cell) सुरू केला आहे. हा कक्ष खऱ्या अर्थाने अनेकांसाठी 'जीवनदायी' ठरत आहे, आणि यामागे एक सुव्यवस्थित यंत्रणा कार्यरत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा मुख्य उद्देश हा राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या निधीतून केवळ वैद्यकीय मदतच नाही, तर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांनाही आर्थिक सहाय्य पुरविले जाते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. मुख्यमंत्री सचिवालयाच्या दि. 13 ऑगस्ट 2015 च्या परिपत्रक क्र. मुमंसनि-...

स्वतः वृद्धाश्रमात राहूनही कमाईचा मोठा भाग समाजाला दान

Image
सिंधुदुर्ग सुपूत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान   मुंबई,  :- डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले... आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर सिंधुदुर्ग सुपुत्राचे नाव. श्री. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील आहे. आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना श्री. करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच श्री. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले. सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही नेर...

छावा निमित्ताने आपण काय स्मरण करूया...

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा     या गीतात आपल्या देशाचे वर्णन करताना गीतकाराने "कुछ तो बात है की हस्ती मिटती नहीं हमारी" असे केले आहे. ती कोणती विशेष गोष्ट आपल्या देशाच्या डीएनए मध्ये आहे ? सोन्याचा धूर निघणारा किंवा सोने पिकवणारा आपला देश असे इतिहासात म्हटले आहे म्हणजे इथे सुबत्ता होती असे मानले तर आज हा देश विकसनशील का आहे ? धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मरण करताना असे प्रश्न आपल्याला का पडत आहेत ?      आपण नेहमी म्हणतो  व्यर्थ न हो बलिदान..     त्यावेळी आपली जबाबदारी वाढते मित्रानो ! लहान मुले निरागस असतात त्यांना आपण आकार देत जातो तेंव्हा त्यांना आपण देव देश आणि धर्माची शिकवण देतो. त्यात ओघाने मातृभूमी भारतमाता म्हणून समोर येते. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडील देवाचे रूप मानले जाते. भारत माता म्हटले की आपल्याला जमेल तशी तिची सेवा करणे, तिच्या साधनसंपत्तीचे सन्मानाचे संरक्षण करणे संवर्धन करणे हे आपले कर्तव्यच बनते. कर्तव्यानेच मनुष्य जन्माला अर्थ प्राप्त होतों. मात्र आपण करत असलेले कर्तव्य योग्य की अयोग्य यासाठी पुन्हा धर्माची आठ...

मराठीची अर्थव्यवस्था मजबूत करूयात !

Image
  मराठी भाषेचा आणि अर्थव्यवस्थेचा संबंध काय? खरंतर जीवनातील अनेक गोष्टींचा आणि अर्थकारणाचा, अर्थव्यवस्थेचा थेट संबंध आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी मागणी आणि पुरवठा या विषयावर महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी असे म्हटले की, पुरवठा आणि मागणीमुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते. बाजारपेठेत एखाद्या वस्तूला, सेवेला मागणी मिळण्याआधी ती बाजारपेठेत उपलब्ध देखील असायला हवी. किंवा मागणी आल्यावर त्वरित उपलब्ध व्हायला हवी. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याचा थेट संबंध असून ह्यावरच सर्व अर्थचक्र अवलंबून आहे. मराठीभाषेला अभिजात दर्जा मिळाला, ह्या मुळे भाषेच्या संवर्धनाकरिता काही कोटी रुपयांचं अनुदान केंद्र सरकारकडून मिळेल. येणाऱ्या 10 मार्चला महाराष्ट्राच्या बजेट मध्ये मराठी विभागाकरिता घसघशीत निधीची घोषणा देखील होईल. पण ह्याच बरोबरच माय मराठी भाषेचे सुपुत्र म्हणून आपली देखील जवाबदारी असून ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा. आपल्या मराठीला चिरंतन ठेवायचं असेल तर तिची मागणी व पुरवठा हा कायम अखंडितच हवा. मराठी भाषेची मागणी आणि पुरवठा असल्यास ...

एकात्म मानवतावाद : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टिकोन

  आज स्वातंत्र्यप्राप्त भारत अमृत काळाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी संपूर्ण जग अनिश्चिततेच्या वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर, नेहमीच सर्वसमावेशक आणि निसर्ग केंद्रित प्रगती साध्य करण्याचा दृष्टिकोन स्वीकारणारा भारत, आज संपूर्ण जगासाठी शाश्वत विकासाचा आदर्श ठरत आहे. निसर्गाकडे केवळ एक संसाधन म्हणून पाहणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीला आज उत्तरं सापडत नाही. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांसारख्या मतप्रणालींमध्ये अडकलेले व्यवस्थापन कोसळत आहेत किंवा अंतर्गत व बाह्य संघर्षात गुरफटले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, देश देखील अशाच एका द्विधा स्थितीत होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसा विकासाचा मार्ग ठरवता आला नाही आणि ते या तिन्ही विचारसरणींमध्ये हेलकावत राहिले. अशा परिस्थितीत, एका दूरदर्शी विचारवंताने एकात्म मानवतावाद या चिरंतन तत्त्वज्ञानाचा प्रस्ताव मांडला. हा विचार मांडणारे होते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य होते. परंतु त्यांनी वारंवार स्पष्ट क...